Friday, 3 February 2017

आम्ही सांगू तीच पुर्व

कालच व्हाट्सअप वर एक संदेश वाचला ज्यामध्ये आजकालची तरुण मंडळीना कशी वैचारिक झोप लागलीय, त्यांचं बौद्धिक कुपोषण झालाय याचा बराच उहापोह केला गेलाय. नाही, विषय एकदम बरोबरच आहे. ज्या लोकांना इतक्या दिवसाचे फुकट खाऊन खाऊन अजीर्ण झाल्यानंतर त्यातून भ्रष्टचाररुपी तुंबलेल्या गटारची दुर्गंधी सुटली आणि नेहरू-गांधी यांचं कसल्याही परिस्तिथितीत गुणगान गाण्याची जी सवय (हागवणूक) लागली, त्यांची हि सगळी थेरं  डोहाळे लावून सामान्य लोकांनीच उस्फूर्तपणे उजेडात आणली. यामुळे खरा राग आलाय या तथाकथिक पुरोगामी लोकांना.

या पुरोगाम्यांनी विद्यापीठ, वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्या (?? कोंबड्याच्या झुंजी लावण्याऱ्या) ह्या सगळ्यां ठिकाणी त्यांची मक्तेदारी त्यांनी गेल्या ५५-६० वर्ष्याच्या काँग्रेसी सत्ताकाळात उभी केली आणि त्याद्वारे त्यांच्या विरोधी किंवा सहमत नसलेली विचारधारा दाबून ठेवली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, विद्यापीठात कोणा विध्यार्थाचा संशोधन निबंध मंजूर केला नाही तर कधी त्यांच्याशी सहमत नसणाऱ्यांना वृत्तपत्रे -वृत्तवाहिन्या व्यासपीठावर आवाज दिला नाही. वा  रे, पुरोगामी आणि हीच का तुमची व्यक्तिस्वातंत्राची परिभाषा. स्वतः म्हणू तीच पूर्व अशी हि वृत्ती आहे. आम्ही सांगू तेच नेते चांगले, आम्ही ठरवू तीच भारताची सांस्कृतिक ओळख, आम्ही लिहू तोच भारतीय मामूजान इतिहास आणि आम्ही सांगू तीच भारतीय सहीष्णूता.

या सर्व गोष्टीबद्दल उहापोह करून, त्याला पुरावे सादर करून खरी कि खोटी ती कितपत योग्य हे तपासायला नको कि तुम्हाला पोसण्याऱ्या काँग्रेसी सत्ताधीशांच्या सोयीची असणारी सगळीकडची वैचारिक मक्तेदारी आता उध्वस्त होतं आहे, हे खरं दुखणं सांगताही येत नाही.

समाज माध्यमेद्वारे ( ट्विटर, फेसबुक आणि व्हाटसप ) फिरणारी माहिती खरीच असते असं नाही पण ती पूर्णपणे खोटी असते किंवा त्यात बिलकुल तथ्य नसते असा एक समाज पसरवण्याचा हेतू आहे या लेखामागचा. समाज माध्यमेच्या द्वारे इंटरनेट वरील विकिपीडिया, परदेशातील विद्यपीठातील तिथे अध्यानाद्वारे जी तथ्य स्थापित झाली आणि त्यांच्या संदर्भाने भारतात पूर्वी लिहून ठेवलेली इतिहासात म्हणा किंवा समाजशाश्त्रातील जी काही डावी लेखणीद्वारे गृहीतक होती त्यांना आता आव्हान निर्माण होत चाल्लीयेत. मग करा आता दुष्प्रचार या समाज माध्यमांच्या विरोधात.

जरा निरीक्षण करा, गेल्या वर्षभरात काँग्रेसी आणि त्यांच्या डाव्या, फसव्या पुरोगामी लोकांनी ट्विटर, फेसबुक आणि व्हाटसप द्वारे ज्या लोकांनी त्यांना नागडं केलाय त्या सर्वाना आणि या व्यासपीठालाच खोटं माहिती देतात, लोकांना , तरुणांना चिथावणी देतात असल्या आरोपाद्वारे त्यांचा आवाज दाबण्याचा पद्धतशीरपणे एक कलमी कार्यक्रमचं चालू केलाय. जरा कोणी गांधी -नेहरूच्या चुकीच्या धोरणाची टीका केली किंवा सावरकरांची चांगली बाजू मांडली कि म्हणा त्याला "मोदी -भक्त" आणि कर त्याचा तोंड बंद. अशी हि यांची पुरोगामी वैचारिक उहापोहाची पद्धत. गांधी -नेहरू, डॉ आंबेडकर याची प्रतिमा एवढी  आवाजावजी मोठी केलीय आणि त्यांना देवाचं बनवून ठेवलय. जशी आता मोदींच्या प्रत्येक निर्णयाची चांगली - खराब अशी दोन्ही बाजूने वैचारिक चर्चा होते म्हणा, यात टिंगल टवाळीच जास्त आहे, तशी चर्चा का बुवा होऊ नये या नेत्यांच्या बाबतीत.

या लेखाचा दुसरा हेतू म्हणजे सामान्य लोकांना त्यांची स्वतःची अशी वैचारिक क्षमता  नाही आणि म्हणून या समाज माध्यमाद्वारे तयार झालेल्या तथाकथिक आभासी वास्तवावर विश्वास ठेवू नये अशा शहाणपणा हा लेख झोडतो. का बुवा, तुमच्या डाव्या वैचारिक  बैठकीचा धुव्वा उडवला जातोय म्हणून ते लगेच आभासी वास्तव आणि तुम्ही सांगाल तेच वास्तव का बरे मानावे. असं करताना मग या सामान्य लोकांची काय डुलकी लागत नाही काय कि तुमचे विचार हे एकदम प्रथिनयुक्त असून वैचारिक पोषण करणारे (कि हगवण लावणारे !!) आहेत.

थोडक्यात काय तर, दुसऱ्याचं ते कार्ट आणि माझा तो (राहुल)बाबा आणि आम्ही सांगू तीच (नेहरू-गांधी) पूर्व दिशा. आमच्याशी जो सहमत नाही ते सगळे "मोदी-भक्त" किवा  जल्पक (लोकसत्ताचे हुशार संपादक कुबेराचा हा शब्द आहे ट्विटर ट्रोल साठी).

ता.क . स्वतःची बुद्धी वापरून तुमच्या वाचनाची सवय जर चांगली झाली, देशो देशीचे संशोधनाचे ज्ञान समाज माध्यमावर तुमच्या दारात आले तर आम्ही आमची दुकान चालवयची कशी? हा प्रश्न विचारलं तर बघा हा, मोदी भक्त कुठले ;)

Tuesday, 13 October 2015

सामान्य जनतेच्या IQ'वर विश्वास ठेवा

२०१५ सालात चर्चवरील हाल्यांपासून (त्यांचा पुढे निष्कर्ष काय झाला कोणाला माहित नाही, आहे माहित कोणाला?) ते आता मागील आठवड्यातील दादरी घटनेपर्यंत अनेक वृत्यापात्रातून अग्रलेख, वितारवंताचे लेख, वाचकांचे बरेच पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. सर्व लेखामध्ये भारताची घटनादत्त प्राचीन अशी धर्मनिरपेक्षीता, सर्वधर्मसमभाव जी भारताची ओळख आहे ती फक्त तथाकथित पुरोगामी राजकीय पक्षांनी टिकवून ठेवली आहे, ती म्हणे धोक्यात आली आहे असा एक सूर उमटतो आहे. जणू काही, आता ती लगेच काळाच्या पडद्याआडच जाणार. आपल्या देशाचा, जनतेच्या निर्णयाचा इतिहास बघितल्यास असे काही होईल असं मुळीच वाटत नाही; कारण जी धर्मनिरपेक्षीता १९६९ च्या गुजरात, १९८४ च्या शिख, १९८९ च्या भागलपूर दंगलीमुळे आणि १९९२-९३ च्या बॅाम्बस्फोटानंतर झालेल्या दंग्यामुळे आणि या सर्व आणि या व्यतिरिक्त इतर काही घटनानंतरही टिकून आहे ती सध्याच्या काही घटनांमुळे कशी नष्ट होईल. पण, अशी आरोळी/आवाई सारखी सारखी ऊठवून ती नष्ट करण्याचे प्रयन्त मात्र नक्कीच होणार. भारतीय समाज मूळातच सहिष्णू आहे, लोकांना थोडं उशीरा का होईना पण शहाणपण आलेलं आहे. 

या सर्व ठेचा (मिरचीचा) खाऊन लोक बरेच समजूतदार झालेत, त्यात Whatsapp/फेसबुक/ट्विटर सारखे माध्यमांचा 'विधायक' उपयोग लोकांच्या लक्ष्यात आला आहे. त्यामुळे पुर्वीसारख कोणीही उपटसुंभ यावा, लोकांना चिथावणी देऊन अघटीत घडवून आणावं असा होणार नाही आणि आम्ही समजूतदार लोकं हे होवू  देणार नाही. 

माध्यमांनी त्याच काम मात्र चोख, प्रामाणीकपणे कराव. सत्ताधारी चुकत असतील तर त्यांना टिकेने झोडपून काढा, पण जर ते चांगल काम करत असतील तर त्यांच कौतूक राहू दे, पण चांगल्या धोरणाबद्दल' प्रोत्साहन' तर द्या. भडक विधानांची भलावण माध्यमांनी टाळली पाहिजेत, कारण सध्या वृतपत्र/वृत्तवाहिन्या यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. याचं मूळ कारण म्हणजे, वृतपत्र/वृत्तवाहिन्या यांच्या मालकांचे राजकीय लागेबांधे सगळे whatsapp/फेसबुक/ट्विटर च्या कट्ट्यावर उघड झाले आहेत, त्यामुळे लोकांना समजलंय कि यांना किती गंभीरपणे घ्यावं. तेंव्हा, माध्यमांनी आणि प्रस्थापित बुद्धिवाद्यांनी कितीही गळे काढले तरी सामान्य माणसांची मती ते भुलवू शकणार नाहीत आणि असेच जर ते करत राहिले तर सामान्य जनता याच्याकडे साफ दुर्लक्ष करेल. मला एवढेच म्हणायचे आहे, सामान्य जनतेच्या बुद्धीमत्तेला कमी लेखू नका, कारण यांनीच २०१४ मध्ये भ्रष्टाचाराची गटारी स्वच्छ केली आहे आणि तश्याच पद्धतीने ते जर वेळ आली तर तथाकथित धर्मवादी सरकार उलथवून टाकतील. (हिंदुत्ववादी नव्हे, कारण धर्मनिरपेक्षीतावदी हेदेखील छुपे धर्मवादीच आहेत). 

Friday, 14 February 2014

Valentine Special


माझ्या अर्धांगीनिसाठी काही शब्द 

The feeling felt at its best,
Holding Hands and Glance, 
Breathing together, Knowing each other,


Without saying a single word,
Walking through mountain adversaries with smile,
For each others smile..
Be My Valentine oh my Love Madhuri for all the journey of immortal time..

Tuesday, 11 February 2014

भारतीयत्वाची तहान, सामाजिक नाकार्लेपण आणि संधी

सत्या नाडेला  यांची मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी -CEO पदावर नियुक्ती झाली आणि भारतीय म्हणून थोड का होईना, आपल्या अंगावर मांस वाढले. आपल्या देशातील एक व्यक्ती शिकून, मेहनतीने उच्च पदावर पोहचल्याचा आनंद साजरा करावा कि नको? पण तो केलाच तर त्यातून काय बोध घ्यावा याबद्दल अतिशय तिखट शब्दात, योग्य अशा कारणासहित विवेचन लोकसत्ता संपादक श्री. गिरीश कुबेरांनी या लेखाद्वारे ( बेगने शादी मे ) केले आहे. श्री. कुबरांनी आपल्या या वृत्तीची अक्षरशा वाभाडे काढलेत आणि हा लेख वाचल्यानंतर माझी अश्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे हे खरे. हा लेख वाचल्यानंतर मी आपल्या या बांडगुळी भारतीयत्वाच्या तहानेकडे थोड्याश्या निराशेनच पाहत होतो.  मग दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या M.B.A. च्या प्राध्यापकांनी खूप छान आणि अगदी वेगळी प्रतिक्रिया फेसबुकवर नोंदवली आणि त्यामुळेच हि ब्लॉगपोस्ट तयार झाली.

बरेच भारतीय, जे सध्या "जागतिक भारतीय" म्हणून  सन्मानाने मिरवतात ते खरच आपल्या या "भारतीयत्वाचा" अभिमान बाळगतात कि नाही, जर तसा अभिमान असेल तर का आपण तो साजरा करू नये. उदाहरण द्यावयाचे झाल्यास प्रणव मिस्त्री  चे आपण देवू शकतो. त्याने स्पष्टपणे कबुल केले आहे, आजवर जे काही संशोधन त्याने केले आहे त्याची  प्रेरणा, स्फूर्ती त्याला आपल्या देशांतील सामाजिक समस्यांमधून आणि भारतीय पौराणिक गोष्टीतून मिळाली आहे. याशिवाय डॉ. शिव आय्यादुराई यांचेही उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यांनी ई -मेल क्रांती आणली, त्यांचे द ई -मेल रेवोलुशन खूपच प्रसिद्ध असे पुस्तक आहे आणि जे सध्या भारतीय प्राचीन सिद्ध -आर्युवेदिक औषधोपचार आणि आधुनिक आरोग्यशात्र यांची सांगड घालण्याचा प्रयत्न, संशोधन करत आहेत.   

ज्यांनी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध केल आहे असे भरपूर भारतीय आहेत, त्याचबरोबर भारतीयत्वाची ओळख पदोपदी, त्याच भांडवल न करता, जतन केली आहे अशा लोकांचे यश का म्हणून साजरे करू नये. याशिवाय जे लोक आपल्या लोकांच्या सन्मानाने हुरळून न जाता, आपल्या शैक्षणिक, समाजिक आणि राजकीय व्यवस्थेमधील पोकळपणा दाखवत असतील तर त्याने दुखी न होता त्यांवर सुधारणा शोधण्यात सुख मानावे. सध्याच्या घडीला यशस्वी "जागतिक भारतीय" यादी मोठी होत आहे आणि त्याबरोबर आपल्या इथिल शिक्षण संस्थामधून बाहेर पडून, आंतराष्ट्रीय कंपनीचे कार्यकारी अधिकारी, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रामध्ये जाऊन शास्त्रज्ञ/संशोधन करणारे वा तश्या संधी नाकारणारे काही कमी नाहीत. या आनंद उत्सवाला एक संधी का बर मानू नये?

गिरीश कुबेरावतीरिक्त मजेशीर, आपल्याला कोपरखळी मारत पण गंभीरपाणाचे पदर सुटू न देत,छोटीशी खास कोल्हापुरी भाषेच्या मुशीतून आलेली प्रतिक्रिया ही खाली दिलेली आहे. मूळ लेखक हे माझे M.B.A. सवांद कौशल्य आणि व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण सुधारणा विकास या विषयाचे प्राध्यापक श्री. राजेंद्र पारिजात ( ज्यांना मी खूप घाबरायचो, त्यांनी पहिल्याच दिवशी, पहिल्याच लेक्चर मध्ये पाय किती पाण्यात आहेत आणि  त्यामुळे किती हातपाय मारावे लागनार  आहेत हे सांगितले ) यांची आहे. 

सत्या तुझ्यासाठी कायपण!!



आयला सत्या तू एवढा मोठा व्हशील अस वाटल न्हवत गा!
शेवटी 'बिलू'बाला कल्ल कि तुम्च्याकडून घेण्यासारखं लई काय है म्हणून 
मागण लई नाही पण ते क्लोउड का काय त्यावर् न आमच्या गावच रस्ते करता येतील का त्ये बघ बाबा.… 
आणि सगळ्या हुशार पोरी बाली हु म्हणून फिरत्या त गा
पर कायदा करून बी 
वाकडी नजर न्हाय बदलली तुझ्या देशातल्या पबिलक ची ...
भावा अस काय तरी जमीव कि मनात कै झाल न्हव कि तुझ्या सरवर ला सायरन वाजला पाहिजे बघ .
सगळी गल्ली जागी होवून शान बुक्का झाला पायजे अल्स्यानचा 
त्यो केज्रीवालंचा अरव्या झाडू घेवून लागलाय मागे 
पन त्येला काय निभत नाही ते ... 
ते मफलर घेवून रसत्यावर झोपत्याल आणि परत ऑफिसला जात्याल
त्याला एक एम एस ओफ्फिस शिकीव म्हणजे झाले ..
आणि तरणी तरणी पोर पोरी घेतासा तुम्ही पण 
ती आय बापाला सोडून जात्याल न्हव का ?
तवा इथच गावा कड काय जमवता येतय का बघ कि गा !..
अजून आमच्या पाण्यात विष कालवून पित्याल रे ते 
जनावर आणि मान्स सगळी फुकापासरी मर्त्याल्च रे 
त्ये तुझा क्लोउद ला गिरीन हौसे च काय कसे व्हत नाही गा !
अशी फुकट मर्नार्यांचे काय तरी बग बाबा ...
तुला काय प्रत्यक्ष भेटू नाही जमल प्र फोटू बघितला , 
जीवाल काय तरी खा .. उगाच वणवण करू नग 
त्यो बिल्या हिकड भारतात फिर्तुया शेताव् र ण 
चैन्या करत .. तू तिकड एवढा घोर लावून घेवू नग ..
प्र काय बी म्हण 
सत्या 
एकदा 
नाद खुळा काम दावच सगल्यास्नी ...
तवा मग अहि पण म्हणू 
सत्या तुझ्यासाठी काय पन..
होवूंदे खर्च 
आमचा सत्या हाये गच्च ..."

Monday, 27 January 2014

वाचा NET-के

 वाचा NET-के 

सय  - सई परांजपे 

हे लोकसत्ता - लोकरंगमधील  ( दि. २६ जाने) लेख खूपच छान आहेत. याचबरोबर चतुरंगमधील,  (दि. २५ जाने २०१४ ) काळाच्या पुढे जाताना  - लेखदेखील खूपच छान असून "शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी" का म्हटलं जात याची डोळस उदाहरणं आपल्यासमोर ठेवतात. 


Friday, 24 January 2014

टिकटिक २०१४ …

"W for Watch… म्हणजे टिकटिक" शोमुबाळ सांगतो. खाऊ खात, दंगा मस्ती  करत माझा मुलगा A, B ,C… म्हणून टाकतो. टिकटिकागणिक तो मोठा होतो आहे आणि आम्ही सगळे मोठ्याचे छोटे होऊन परत अनुभवसंपन मोठे होत आहोत. काही महिन्यात तो २ वर्ष्याचा होतो आहे. नवीन वर्ष चालू होवून आता २३ दिवस झाले, हि टिकटिक किती दिवस, वर्षानुवर्षे चालू आहे, चालू राहील. दरवर्षी नूतन वर्षानिमित्त काही लेख येतात आणि बहुतेक सरलेले वर्ष बाळ म्हणून आले आणि म्हातारे होवून गेले, असा काहीसा संदर्भाने लिहिले गेलेले असतात. मला आपल वाटल, आपण जरा उलटा विचार करून बघू, म्हणजे "पोटली बाबा कि" या दूरदर्शनवरील मालिकेत जस तो म्हातारा बाबा गोष्टी सांगत-सांगत आणि गोष्टी जमा करत दिवसेंदिवस तरुण होत जात असतो तसाच काहीस!!

नवीन वर्ष येतच मुळात घेऊन अनपेक्षित गोष्टी आणि आपल्याला ते या गोष्टी सांगत तरुण होत शेवटी तान्हं बाळ होत आणि जाता -जाता पुढील वर्षासाठी अनुभव समृद्ध काळ मागे ठेवून सोडून जात. मला हे अस वाटण्यामागे आणखी एक कारण आहे. मागील वर्षी संप्टेंबर २०१३ मधे २०११ सालची लोकसंखेची एका वर्षातील वयानुरूप माहिती लोकसंख्या आयोगाने प्रकाशित केली आहे. २०११ हे भारताचे सर्वात तरुण वय, कारण १५-२४ वयोगटातील लोकसंख्या त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहचली आणि १५-६४ हा कार्यक्षम,क्रयशक्ती असलेले गट हा लोकसंखेच्या ६४% इतका होता. थोडक्यात २०११-२०१३ दरम्यान आपला देशाने त्याच्या ऐन तारुण्यात पदार्पण केले आणि पुढील ६ वर्षे तरुण राहील, म्हणजे २०२० साली सरासरी वय २९ असेल. या संदर्भाने विचार केल्यास दरवर्षी जगभरातील एखादा देश हा तरुण होत असेल आणि एखादाच्ये वय वाढत असेल, हो ना? 

मग, आपण येणारा काळ किंवा वर्षे  तरुण आहेत असे काही प्रमाणात म्हणू शकतो कि नाही?  कदाचित थोडा कल्पनाविस्तार असेल पण काय हरकत आहे असा विचार करायला. पोट्लीवला बाबा सगळीकडे फिरून लहान मुलांना छान छान गोष्टी सांगत नव-नवीन गोष्टी जमा करत तरुण होत जातो आणि लहान तान्हा होतो, तशीच हि पुढे येणारे वर्षे असू देत. 

लोकसंख्येबद्दलची माहिती खालील काही दुव्यावर उपलब्ध आहे आणि या अनुसंगाने येणारे आर्थिक धोरणे आणि सध्याची परिस्तिथी याबद्दल पुढील एखाद्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहीन.  

दुवे- http://www.censusindia.gov.in/2011census/population_enumeration.aspx
http://catalyst.nationalinterest.in/2013/09/09/the-age-of-india/
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6911544.stm

नवीन वर्ष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. 

Friday, 20 December 2013

गोंधळ बातम्या, गोंधळ चर्चा आणि आपली फसवणूक 


दूरदर्शनवरील बातमीपत्र आठवतात का रे तुला ? रोज सायंकाळी ७ वाजता असतात पण सध्या प्रदीप भिडेंचा भारदस्त आवाज नसतो. तो आवाज फक्त भारदस्त होता असे नव्हे त्याबरोबर एक संथ लयीवर सर्व बातम्या, दिवसभराच्या घडामोडी सांगितल्या जायच्या. कधीही , कुठेही घाई - गडबड आणि मुख्य म्हणजे आरडओरडा नाही. अजूनही दूरदर्शनवरील बातमीपत्र तशीच आहेत आणि मला अआवर्जून आवडतात बघयला. 

खाजगी वाहिन्या तांत्रिक दृष्ट्या प्रगत असतील पण त्यांना दूरदर्शनसारखी थोडक्यात, महत्वाचे आणि मोजक्या शब्दात सांगण्याची कला आणि कसब नाही अस वाटत. कदाचित, २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या असल्यामुळे तेथे बातमीपत्र "लांबलचक" आणि "दिलखेचक" अदाकारीने सांगितली जातात. बातमीपत्र सांगणारा/री यांचा पोशाख  पण कमालीचा बदलला आहे आणि ते सुटाबुटात दिसतात, महिला निवेदक सुद्धा!!. दूरदर्शनवरील निवेदक मात्र पारपंरिक आणि नाविन्य दोन्हींचा वापर करताना दिसतात. दीपावली, दसरा यासारख्या सणादिवशी हमखास पारपंरिक पोशाख त्यातही दूरदर्शनचे मात्र एवढे भारीतील नसतात पण खाजगी वाहिन्यावरील ( IBN -लोकमत, ABP -माझा ) निवेदक एकदम चमचमत असतात. 

हे सर्व वरवर दिसणारे फरक आहेत. मला ज्याकडे लक्ष वेधायचे आहे ते म्हणजे, खाजगी वाहिन्यावर असणारी चर्च्यासत्राकडे , ४-५ वेगवेगळ्या क्षेत्रातील ( त्याच्यादृष्टीने बुद्धिमान, विद्वान  हा !!)  लोकांना घेऊन जो गोंधळ घातला जातो त्यामुळे बातमी बघण्यातील सगळा रस निघून जातोय. चर्चासत्र चालू होते ते मुळात एखाद्या ब्रेंकिंग न्यूजने आणि त्यावर सगळी मंडळी, निवेदाकाबरोबर तो विचारील त्या प्रश्नाला उत्तर न देता आणि वेगळाच काहीतर मुद्दा सांगत /मांडत नाहक वादविवाद ( हीच का ती चर्चा ) करताना दिसतात. निवेदकपण काही कमी नाहीत. तो/ती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो/ते  सगळ्यांना आणि प्रत्येकाची मते ( भाग घेणारी मंडळी स्वताचे  मत रेटत राहतात ) मागतो. राजकीय चर्चा असल्यास तर अजून फोडणी आणि भडका असतो. नेतेमंडळी आपला पक्ष कसा बरोबर ( घड्याळातील वेळ!!) आहे आणि तो किती निर्मळ ( कमळ नव्हे !!), स्वच्छ  ( हात असतात ) आहे हे अगदी पान खाऊन आणि तोंड रंगवून ( स्वताचेच)  बडबड करतात. 

या अश्या चर्चांमुळे आपण  मात्र एखाद्या घटनेचे गांभीर्य हरवून बसतो आणि मुख्य मुद्दा बाजूला जाऊन भलतीकडेच चर्चा संपते आणि लोक त्या बातमीकडे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पाहतपण नाहीत. हि एक प्रकारे आपली फसवणूक आहे ती नाही… हो फसवणूक कि हसवणूक!! कारण बातम्या, चर्चासत्र म्हणजे आता करमणूक झाली आहेत. पूर्वी अश्या कार्यक्रमातील लोक त्या घटनेतून बोध घेऊन शोधून शोधून एक तर त्याबद्दल लिहित किंवा त्याच्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत. आताही काही अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर सगळा उजेडच ??? ( उजेड कसा म्हणायचं  बर ) सगळा अंधारच आहे. ह्यातसुधा ती वाहिनी कोणाच्या मालकीची आहे त्यावर बातमीचा ढंग, निवेदन आणि त्याची तीव्रता ठरते. 

दीपक चौरासिया म्हणायचा "चैनसे सोना है, तो जाग जाओ" तसे आता म्हणायची वेळ आली आहे " छान बातम्या ऐकायःचा आहेत तर "दूरदर्शन " पहा"… फसवणूक करून घेऊ नका…