Wednesday, 12 April 2017

कर्जमाफी - उचलली जीभ लावली टाळ्याला

उत्तर प्रदेश मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली हे बरोबर आहे पण पुढचे जे महत्वातचे आहे ते मात्र कोणी सांगत नाही. महत्वाची माहिती ती ही, पुर्ण माफ केलेल्या कर्जाची रक्कम आहे तब्बल रुपये ३६,३५९ कोटी आणि ही सगळी रक्कम त्या संदर्भीत बँकांना ५ हप्त्यात उत्तर प्रदेश सरकार चुकवणार आहे. सरकार ही रक्कम शेतकरी कर्ज दिलासा कर्जरोखेंचे द्वारे (bonds) उभी करणार आहे.

यातही महत्वाची गोष्ट की जे काही कर्जांना माफी दिलीये ती फक्त अल्प भूधारक शेतकऱ्यांना, तेही १ लाखा पर्यंतचे कर्ज सरकार भरणार आहे. जर कोणी ५-१० लाख घेऊन ठेवले असतील, ते माफ नाही होणार.

महाराष्ट्र राज्यातही शेतकरी कर्जमाफीची मागणी गेली १ महिन्यापासून जोर धरू लागलीय. पण आपले सरकार राज्याचे कर्ज कमी करण्यात गुंतले आहे. रिजर्व बँकेने नुकतंच त्यांच्या रिपोर्ट मध्ये सांगितलं, महाराष्ट्राने रुपये ११,२९० कोटीचे कर्जरोखे परत खरेदी करून राज्याच्या डोक्यावरील कर्ज कमी केले आहे. ( https://rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=39928)

मागील आठवड्यात सातारा येथील दोघे शेतकरी बंधूनी आत्महत्या केली, म्हणे ६० लाखाचे शेतीसाठी कर्ज घेतले. कोण घेतं हो ६० लाखाचे पीक कर्ज. बँक तरी देईल का ६० लाखाचे शेतीसाठी कर्ज आणि असलं कोणतं पीक घेताहेत हे शेतकरी.

तेंव्हा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा हेच योग्य आहे. एक मिनिटात निर्णय घेता येऊ शकतो पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला पाहिजे ना.

गेले काही दिवस शेतकरी आत्महत्या, त्यांची कारणे आणि उपाय याच्यावर जे काही संशोधनात्मक लेख, पेपर्स आहेत ते वाचतो आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदी संस्थेच्या  (NCRB - http://ncrb.nic.in/  ) माहितीनुसार भारतात साधारण ७५००-८००० शेतकरी आत्महत्या करतात त्यातील साधारण सरासरी ३१००-३२०० महाराष्ट्रातील शेतकरी असतात. महत्वाची गोष्ट लक्ष्यात घेण्यासारखी म्हणजे, सगळ्या आत्महत्या ह्या नापिकी किंवा कर्जामुळे नाहीयेत. महाराष्ट्र राज्यातील साधारण ४२% टक्के शेतकरी कर्जमुळे किंवा दिवाळखोरीमुले मृत्यु कवटाळतात हेच प्रमाण राष्ट्रीय पातळीवर ३८% आहे व पिका संदर्भातील अडचणीमुळे १९% टक्के शेतकरी आत्महत्या करतात. याचाच अर्थ असा की  ५७% शेतकरी कुटुंब आहेत ज्यांना मुळात मदत मिळाली पाहिजे ज्यांनी नापिकी किंवा कर्जामुळे स्वतःची देह टाकला बाकी ४३% शेतकरी आत्महत्या ह्या इतर कारणामुळे होतात त्यांना कर्जमाफीची कि इतर  मदत मिळता कामा नये. ( खाली दिलेली माहिती संदर्भ NCRB -२०१५ रिपोर्ट)



महाराष्ट्रातील ३१०० - ३२०० शेतकरी आत्महत्यांपैकी सरासरी १२००-१३०० शेतकरी हे कर्जामुळे किंवा पीक नुकसानी किंवा नापिकी या कारणामुळे होतात. यातही जिल्हानिहाय आकडेवारी बघीतली तर यवतमाळ, अकोला, अमरावती, बिड व लातूर ह्या जिल्ह्यामधे आत्महत्या जास्त आहेत.

जे शेतकरी कर्जामुळे मृत्यूला कवटाळतात त्यांचे सरासरी कर्जाची रक्कम हि सरासरी ३५,००० रुपये आहे. हि सर्व माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदी संस्थेच्या  (NCRB ) वार्षिक आणि तिमाही रिपोर्टस मध्ये उपलब्ध आहे, पण आपले चॅनेल वरचे पत्रकार आणि वृत्तपत्रे यांना हि सर्व माहिती उलगडून सांगायला वेळ नाही म्हणा किंवा एवढी मेहनत करण्याची त्यांची तयारी की योग्यता नाही म्हणा.




शेतकरी आत्महत्यांपैकी ७०-७५% शेतकरी हेय अल्पभूधारक (ज्यांची शेती २.५ एकर पेक्षा कमी आहे) आहेत (वर दिलेले सांख्यिकी माहिती NCRB च्या २०१५ च्या रिपोर्ट मधून). अशाच फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जावी. जे शेतकरी ५-१० किंवा १५ एकर बागातदार शेती ज्यांची आहे त्यांना कर्जमाफी मिळता कामा नये.

कर्जमाफी म्हणजे उगाच हुईई करून आदोंलन करत सगळ्यांचीच माफ करा अस सांगुन राजकारणी स्वत:ची सहकारी बॅकांमार्फत केलेल्या घोटाळ्यद्वारे फाटलेली पोती शिवणार. ज्या शेतक-यांस खरी गरज आहे तो राहतोच बाजुला.

उत्तर प्रदेश मध्ये दिली गेलीली शेतकरी कर्ज मदत मला वैयक्तिक तरी अजिबात पटत नाही. खाली दर्शवलेली राज्यनिहाय आत्महत्याची माहिती बघा. उत्तर प्रदेश मध्ये आत्महत्येचा प्रमाण हे इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. हि माहिती २०१५ ची आहे, कदाचित २०१६ सालामध्ये त्यात वाढ झाली असावी.

तेव्हा राज्यांच्या कारभ-यांनो होऊ द्या कर्जमाफी दमानं, होऊ द्या दमानं घाई नाही.

Tuesday, 7 March 2017

जागतिक महिला दिन - ३६५ दिवस

व्हाट्स अप वर सकाळपासून महिला दिन विशेष मेसजेचा पाऊस पडत होता. एरवी जी मित्र मंडळी वर्षभर स्त्रियांच्यावरअश्लिल विनोदांचा खच पाडतात, तिच्या दिसण्यावरून, कपडे घालण्याच्या पद्धतीनुसार तिला 
बेब, आयटम, सामान काय वाट्टेल ते बोलतात ...३६४ दिवस तिचाआदर नाही करत, आज अचानक महिला दिनानिमित्त लगेच स्त्रियांना शुभेच्छा पाठवतात. अक्षरसह: व्हाट्स अप वरुनच कानाखाली जाळ काढावा वाटतो अश्याच्या. 

हा, दिन साजरा झालाच पाहिजे पण तो ३६५ दिवस, वर्षभर ..

लक्ष्मी-भवानीमाता-चंडिका-सरस्वती 
अशी नानाविध रूप तिची
तिच्यात असलेल्या असम्य-दुर्दम्य सृजनशिल शक्तिला प्रणाम 

मनाला खूप भावलेली आणि अशीच व्हाट्स अप आलेली कविता 

आईच्या आईपणाला
तिच्यातील बाईपणाला
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना शुभेच्छा..!!
बायको नावाच्या अर्धांगिनीला
तिच्यात दडलेल्या कारभारणीला
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा..!!
सख्या,चुलत,मावस बहिणीला
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला शुभेच्छा..!!
मावशी आणि आत्याला
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला शुभेच्छा..!!
आज्जीच्या संस्कार सृष्टीला 
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला 
घरच्या आणि शेजारच्या काकूला
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला शुभेच्छा..!!
मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या
भूत,वर्तमान,भविष्यकाळी  रणरागिनींना
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा

Friday, 3 February 2017

आम्ही सांगू तीच पुर्व

कालच व्हाट्सअप वर एक संदेश वाचला ज्यामध्ये आजकालची तरुण मंडळीना कशी वैचारिक झोप लागलीय, त्यांचं बौद्धिक कुपोषण झालाय याचा बराच उहापोह केला गेलाय. नाही, विषय एकदम बरोबरच आहे. ज्या लोकांना इतक्या दिवसाचे फुकट खाऊन खाऊन अजीर्ण झाल्यानंतर त्यातून भ्रष्टचाररुपी तुंबलेल्या गटारची दुर्गंधी सुटली आणि नेहरू-गांधी यांचं कसल्याही परिस्तिथितीत गुणगान गाण्याची जी सवय (हागवणूक) लागली, त्यांची हि सगळी थेरं  डोहाळे लावून सामान्य लोकांनीच उस्फूर्तपणे उजेडात आणली. यामुळे खरा राग आलाय या तथाकथिक पुरोगामी लोकांना.

या पुरोगाम्यांनी विद्यापीठ, वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्या (?? कोंबड्याच्या झुंजी लावण्याऱ्या) ह्या सगळ्यां ठिकाणी त्यांची मक्तेदारी त्यांनी गेल्या ५५-६० वर्ष्याच्या काँग्रेसी सत्ताकाळात उभी केली आणि त्याद्वारे त्यांच्या विरोधी किंवा सहमत नसलेली विचारधारा दाबून ठेवली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, विद्यापीठात कोणा विध्यार्थाचा संशोधन निबंध मंजूर केला नाही तर कधी त्यांच्याशी सहमत नसणाऱ्यांना वृत्तपत्रे -वृत्तवाहिन्या व्यासपीठावर आवाज दिला नाही. वा  रे, पुरोगामी आणि हीच का तुमची व्यक्तिस्वातंत्राची परिभाषा. स्वतः म्हणू तीच पूर्व अशी हि वृत्ती आहे. आम्ही सांगू तेच नेते चांगले, आम्ही ठरवू तीच भारताची सांस्कृतिक ओळख, आम्ही लिहू तोच भारतीय मामूजान इतिहास आणि आम्ही सांगू तीच भारतीय सहीष्णूता.

या सर्व गोष्टीबद्दल उहापोह करून, त्याला पुरावे सादर करून खरी कि खोटी ती कितपत योग्य हे तपासायला नको कि तुम्हाला पोसण्याऱ्या काँग्रेसी सत्ताधीशांच्या सोयीची असणारी सगळीकडची वैचारिक मक्तेदारी आता उध्वस्त होतं आहे, हे खरं दुखणं सांगताही येत नाही.

समाज माध्यमेद्वारे ( ट्विटर, फेसबुक आणि व्हाटसप ) फिरणारी माहिती खरीच असते असं नाही पण ती पूर्णपणे खोटी असते किंवा त्यात बिलकुल तथ्य नसते असा एक समाज पसरवण्याचा हेतू आहे या लेखामागचा. समाज माध्यमेच्या द्वारे इंटरनेट वरील विकिपीडिया, परदेशातील विद्यपीठातील तिथे अध्यानाद्वारे जी तथ्य स्थापित झाली आणि त्यांच्या संदर्भाने भारतात पूर्वी लिहून ठेवलेली इतिहासात म्हणा किंवा समाजशाश्त्रातील जी काही डावी लेखणीद्वारे गृहीतक होती त्यांना आता आव्हान निर्माण होत चाल्लीयेत. मग करा आता दुष्प्रचार या समाज माध्यमांच्या विरोधात.

जरा निरीक्षण करा, गेल्या वर्षभरात काँग्रेसी आणि त्यांच्या डाव्या, फसव्या पुरोगामी लोकांनी ट्विटर, फेसबुक आणि व्हाटसप द्वारे ज्या लोकांनी त्यांना नागडं केलाय त्या सर्वाना आणि या व्यासपीठालाच खोटं माहिती देतात, लोकांना , तरुणांना चिथावणी देतात असल्या आरोपाद्वारे त्यांचा आवाज दाबण्याचा पद्धतशीरपणे एक कलमी कार्यक्रमचं चालू केलाय. जरा कोणी गांधी -नेहरूच्या चुकीच्या धोरणाची टीका केली किंवा सावरकरांची चांगली बाजू मांडली कि म्हणा त्याला "मोदी -भक्त" आणि कर त्याचा तोंड बंद. अशी हि यांची पुरोगामी वैचारिक उहापोहाची पद्धत. गांधी -नेहरू, डॉ आंबेडकर याची प्रतिमा एवढी  आवाजावजी मोठी केलीय आणि त्यांना देवाचं बनवून ठेवलय. जशी आता मोदींच्या प्रत्येक निर्णयाची चांगली - खराब अशी दोन्ही बाजूने वैचारिक चर्चा होते म्हणा, यात टिंगल टवाळीच जास्त आहे, तशी चर्चा का बुवा होऊ नये या नेत्यांच्या बाबतीत.

या लेखाचा दुसरा हेतू म्हणजे सामान्य लोकांना त्यांची स्वतःची अशी वैचारिक क्षमता  नाही आणि म्हणून या समाज माध्यमाद्वारे तयार झालेल्या तथाकथिक आभासी वास्तवावर विश्वास ठेवू नये अशा शहाणपणा हा लेख झोडतो. का बुवा, तुमच्या डाव्या वैचारिक  बैठकीचा धुव्वा उडवला जातोय म्हणून ते लगेच आभासी वास्तव आणि तुम्ही सांगाल तेच वास्तव का बरे मानावे. असं करताना मग या सामान्य लोकांची काय डुलकी लागत नाही काय कि तुमचे विचार हे एकदम प्रथिनयुक्त असून वैचारिक पोषण करणारे (कि हगवण लावणारे !!) आहेत.

थोडक्यात काय तर, दुसऱ्याचं ते कार्ट आणि माझा तो (राहुल)बाबा आणि आम्ही सांगू तीच (नेहरू-गांधी) पूर्व दिशा. आमच्याशी जो सहमत नाही ते सगळे "मोदी-भक्त" किवा  जल्पक (लोकसत्ताचे हुशार संपादक कुबेराचा हा शब्द आहे ट्विटर ट्रोल साठी).

ता.क . स्वतःची बुद्धी वापरून तुमच्या वाचनाची सवय जर चांगली झाली, देशो देशीचे संशोधनाचे ज्ञान समाज माध्यमावर तुमच्या दारात आले तर आम्ही आमची दुकान चालवयची कशी? हा प्रश्न विचारलं तर बघा हा, मोदी भक्त कुठले ;)

Tuesday, 13 October 2015

सामान्य जनतेच्या IQ'वर विश्वास ठेवा

२०१५ सालात चर्चवरील हाल्यांपासून (त्यांचा पुढे निष्कर्ष काय झाला कोणाला माहित नाही, आहे माहित कोणाला?) ते आता मागील आठवड्यातील दादरी घटनेपर्यंत अनेक वृत्यापात्रातून अग्रलेख, वितारवंताचे लेख, वाचकांचे बरेच पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. सर्व लेखामध्ये भारताची घटनादत्त प्राचीन अशी धर्मनिरपेक्षीता, सर्वधर्मसमभाव जी भारताची ओळख आहे ती फक्त तथाकथित पुरोगामी राजकीय पक्षांनी टिकवून ठेवली आहे, ती म्हणे धोक्यात आली आहे असा एक सूर उमटतो आहे. जणू काही, आता ती लगेच काळाच्या पडद्याआडच जाणार. आपल्या देशाचा, जनतेच्या निर्णयाचा इतिहास बघितल्यास असे काही होईल असं मुळीच वाटत नाही; कारण जी धर्मनिरपेक्षीता १९६९ च्या गुजरात, १९८४ च्या शिख, १९८९ च्या भागलपूर दंगलीमुळे आणि १९९२-९३ च्या बॅाम्बस्फोटानंतर झालेल्या दंग्यामुळे आणि या सर्व आणि या व्यतिरिक्त इतर काही घटनानंतरही टिकून आहे ती सध्याच्या काही घटनांमुळे कशी नष्ट होईल. पण, अशी आरोळी/आवाई सारखी सारखी ऊठवून ती नष्ट करण्याचे प्रयन्त मात्र नक्कीच होणार. भारतीय समाज मूळातच सहिष्णू आहे, लोकांना थोडं उशीरा का होईना पण शहाणपण आलेलं आहे. 

या सर्व ठेचा (मिरचीचा) खाऊन लोक बरेच समजूतदार झालेत, त्यात Whatsapp/फेसबुक/ट्विटर सारखे माध्यमांचा 'विधायक' उपयोग लोकांच्या लक्ष्यात आला आहे. त्यामुळे पुर्वीसारख कोणीही उपटसुंभ यावा, लोकांना चिथावणी देऊन अघटीत घडवून आणावं असा होणार नाही आणि आम्ही समजूतदार लोकं हे होवू  देणार नाही. 

माध्यमांनी त्याच काम मात्र चोख, प्रामाणीकपणे कराव. सत्ताधारी चुकत असतील तर त्यांना टिकेने झोडपून काढा, पण जर ते चांगल काम करत असतील तर त्यांच कौतूक राहू दे, पण चांगल्या धोरणाबद्दल' प्रोत्साहन' तर द्या. भडक विधानांची भलावण माध्यमांनी टाळली पाहिजेत, कारण सध्या वृतपत्र/वृत्तवाहिन्या यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. याचं मूळ कारण म्हणजे, वृतपत्र/वृत्तवाहिन्या यांच्या मालकांचे राजकीय लागेबांधे सगळे whatsapp/फेसबुक/ट्विटर च्या कट्ट्यावर उघड झाले आहेत, त्यामुळे लोकांना समजलंय कि यांना किती गंभीरपणे घ्यावं. तेंव्हा, माध्यमांनी आणि प्रस्थापित बुद्धिवाद्यांनी कितीही गळे काढले तरी सामान्य माणसांची मती ते भुलवू शकणार नाहीत आणि असेच जर ते करत राहिले तर सामान्य जनता याच्याकडे साफ दुर्लक्ष करेल. मला एवढेच म्हणायचे आहे, सामान्य जनतेच्या बुद्धीमत्तेला कमी लेखू नका, कारण यांनीच २०१४ मध्ये भ्रष्टाचाराची गटारी स्वच्छ केली आहे आणि तश्याच पद्धतीने ते जर वेळ आली तर तथाकथित धर्मवादी सरकार उलथवून टाकतील. (हिंदुत्ववादी नव्हे, कारण धर्मनिरपेक्षीतावदी हेदेखील छुपे धर्मवादीच आहेत). 

Friday, 14 February 2014

Valentine Special


माझ्या अर्धांगीनिसाठी काही शब्द 

The feeling felt at its best,
Holding Hands and Glance, 
Breathing together, Knowing each other,


Without saying a single word,
Walking through mountain adversaries with smile,
For each others smile..
Be My Valentine oh my Love Madhuri for all the journey of immortal time..

Tuesday, 11 February 2014

भारतीयत्वाची तहान, सामाजिक नाकार्लेपण आणि संधी

सत्या नाडेला  यांची मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी -CEO पदावर नियुक्ती झाली आणि भारतीय म्हणून थोड का होईना, आपल्या अंगावर मांस वाढले. आपल्या देशातील एक व्यक्ती शिकून, मेहनतीने उच्च पदावर पोहचल्याचा आनंद साजरा करावा कि नको? पण तो केलाच तर त्यातून काय बोध घ्यावा याबद्दल अतिशय तिखट शब्दात, योग्य अशा कारणासहित विवेचन लोकसत्ता संपादक श्री. गिरीश कुबेरांनी या लेखाद्वारे ( बेगने शादी मे ) केले आहे. श्री. कुबरांनी आपल्या या वृत्तीची अक्षरशा वाभाडे काढलेत आणि हा लेख वाचल्यानंतर माझी अश्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे हे खरे. हा लेख वाचल्यानंतर मी आपल्या या बांडगुळी भारतीयत्वाच्या तहानेकडे थोड्याश्या निराशेनच पाहत होतो.  मग दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या M.B.A. च्या प्राध्यापकांनी खूप छान आणि अगदी वेगळी प्रतिक्रिया फेसबुकवर नोंदवली आणि त्यामुळेच हि ब्लॉगपोस्ट तयार झाली.

बरेच भारतीय, जे सध्या "जागतिक भारतीय" म्हणून  सन्मानाने मिरवतात ते खरच आपल्या या "भारतीयत्वाचा" अभिमान बाळगतात कि नाही, जर तसा अभिमान असेल तर का आपण तो साजरा करू नये. उदाहरण द्यावयाचे झाल्यास प्रणव मिस्त्री  चे आपण देवू शकतो. त्याने स्पष्टपणे कबुल केले आहे, आजवर जे काही संशोधन त्याने केले आहे त्याची  प्रेरणा, स्फूर्ती त्याला आपल्या देशांतील सामाजिक समस्यांमधून आणि भारतीय पौराणिक गोष्टीतून मिळाली आहे. याशिवाय डॉ. शिव आय्यादुराई यांचेही उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यांनी ई -मेल क्रांती आणली, त्यांचे द ई -मेल रेवोलुशन खूपच प्रसिद्ध असे पुस्तक आहे आणि जे सध्या भारतीय प्राचीन सिद्ध -आर्युवेदिक औषधोपचार आणि आधुनिक आरोग्यशात्र यांची सांगड घालण्याचा प्रयत्न, संशोधन करत आहेत.   

ज्यांनी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध केल आहे असे भरपूर भारतीय आहेत, त्याचबरोबर भारतीयत्वाची ओळख पदोपदी, त्याच भांडवल न करता, जतन केली आहे अशा लोकांचे यश का म्हणून साजरे करू नये. याशिवाय जे लोक आपल्या लोकांच्या सन्मानाने हुरळून न जाता, आपल्या शैक्षणिक, समाजिक आणि राजकीय व्यवस्थेमधील पोकळपणा दाखवत असतील तर त्याने दुखी न होता त्यांवर सुधारणा शोधण्यात सुख मानावे. सध्याच्या घडीला यशस्वी "जागतिक भारतीय" यादी मोठी होत आहे आणि त्याबरोबर आपल्या इथिल शिक्षण संस्थामधून बाहेर पडून, आंतराष्ट्रीय कंपनीचे कार्यकारी अधिकारी, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रामध्ये जाऊन शास्त्रज्ञ/संशोधन करणारे वा तश्या संधी नाकारणारे काही कमी नाहीत. या आनंद उत्सवाला एक संधी का बर मानू नये?

गिरीश कुबेरावतीरिक्त मजेशीर, आपल्याला कोपरखळी मारत पण गंभीरपाणाचे पदर सुटू न देत,छोटीशी खास कोल्हापुरी भाषेच्या मुशीतून आलेली प्रतिक्रिया ही खाली दिलेली आहे. मूळ लेखक हे माझे M.B.A. सवांद कौशल्य आणि व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण सुधारणा विकास या विषयाचे प्राध्यापक श्री. राजेंद्र पारिजात ( ज्यांना मी खूप घाबरायचो, त्यांनी पहिल्याच दिवशी, पहिल्याच लेक्चर मध्ये पाय किती पाण्यात आहेत आणि  त्यामुळे किती हातपाय मारावे लागनार  आहेत हे सांगितले ) यांची आहे. 

सत्या तुझ्यासाठी कायपण!!



आयला सत्या तू एवढा मोठा व्हशील अस वाटल न्हवत गा!
शेवटी 'बिलू'बाला कल्ल कि तुम्च्याकडून घेण्यासारखं लई काय है म्हणून 
मागण लई नाही पण ते क्लोउड का काय त्यावर् न आमच्या गावच रस्ते करता येतील का त्ये बघ बाबा.… 
आणि सगळ्या हुशार पोरी बाली हु म्हणून फिरत्या त गा
पर कायदा करून बी 
वाकडी नजर न्हाय बदलली तुझ्या देशातल्या पबिलक ची ...
भावा अस काय तरी जमीव कि मनात कै झाल न्हव कि तुझ्या सरवर ला सायरन वाजला पाहिजे बघ .
सगळी गल्ली जागी होवून शान बुक्का झाला पायजे अल्स्यानचा 
त्यो केज्रीवालंचा अरव्या झाडू घेवून लागलाय मागे 
पन त्येला काय निभत नाही ते ... 
ते मफलर घेवून रसत्यावर झोपत्याल आणि परत ऑफिसला जात्याल
त्याला एक एम एस ओफ्फिस शिकीव म्हणजे झाले ..
आणि तरणी तरणी पोर पोरी घेतासा तुम्ही पण 
ती आय बापाला सोडून जात्याल न्हव का ?
तवा इथच गावा कड काय जमवता येतय का बघ कि गा !..
अजून आमच्या पाण्यात विष कालवून पित्याल रे ते 
जनावर आणि मान्स सगळी फुकापासरी मर्त्याल्च रे 
त्ये तुझा क्लोउद ला गिरीन हौसे च काय कसे व्हत नाही गा !
अशी फुकट मर्नार्यांचे काय तरी बग बाबा ...
तुला काय प्रत्यक्ष भेटू नाही जमल प्र फोटू बघितला , 
जीवाल काय तरी खा .. उगाच वणवण करू नग 
त्यो बिल्या हिकड भारतात फिर्तुया शेताव् र ण 
चैन्या करत .. तू तिकड एवढा घोर लावून घेवू नग ..
प्र काय बी म्हण 
सत्या 
एकदा 
नाद खुळा काम दावच सगल्यास्नी ...
तवा मग अहि पण म्हणू 
सत्या तुझ्यासाठी काय पन..
होवूंदे खर्च 
आमचा सत्या हाये गच्च ..."

Monday, 27 January 2014

वाचा NET-के

 वाचा NET-के 

सय  - सई परांजपे 

हे लोकसत्ता - लोकरंगमधील  ( दि. २६ जाने) लेख खूपच छान आहेत. याचबरोबर चतुरंगमधील,  (दि. २५ जाने २०१४ ) काळाच्या पुढे जाताना  - लेखदेखील खूपच छान असून "शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी" का म्हटलं जात याची डोळस उदाहरणं आपल्यासमोर ठेवतात.