Monday, 27 January 2014

वाचा NET-के

 वाचा NET-के 

सय  - सई परांजपे 

हे लोकसत्ता - लोकरंगमधील  ( दि. २६ जाने) लेख खूपच छान आहेत. याचबरोबर चतुरंगमधील,  (दि. २५ जाने २०१४ ) काळाच्या पुढे जाताना  - लेखदेखील खूपच छान असून "शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी" का म्हटलं जात याची डोळस उदाहरणं आपल्यासमोर ठेवतात. 


Friday, 24 January 2014

टिकटिक २०१४ …

"W for Watch… म्हणजे टिकटिक" शोमुबाळ सांगतो. खाऊ खात, दंगा मस्ती  करत माझा मुलगा A, B ,C… म्हणून टाकतो. टिकटिकागणिक तो मोठा होतो आहे आणि आम्ही सगळे मोठ्याचे छोटे होऊन परत अनुभवसंपन मोठे होत आहोत. काही महिन्यात तो २ वर्ष्याचा होतो आहे. नवीन वर्ष चालू होवून आता २३ दिवस झाले, हि टिकटिक किती दिवस, वर्षानुवर्षे चालू आहे, चालू राहील. दरवर्षी नूतन वर्षानिमित्त काही लेख येतात आणि बहुतेक सरलेले वर्ष बाळ म्हणून आले आणि म्हातारे होवून गेले, असा काहीसा संदर्भाने लिहिले गेलेले असतात. मला आपल वाटल, आपण जरा उलटा विचार करून बघू, म्हणजे "पोटली बाबा कि" या दूरदर्शनवरील मालिकेत जस तो म्हातारा बाबा गोष्टी सांगत-सांगत आणि गोष्टी जमा करत दिवसेंदिवस तरुण होत जात असतो तसाच काहीस!!

नवीन वर्ष येतच मुळात घेऊन अनपेक्षित गोष्टी आणि आपल्याला ते या गोष्टी सांगत तरुण होत शेवटी तान्हं बाळ होत आणि जाता -जाता पुढील वर्षासाठी अनुभव समृद्ध काळ मागे ठेवून सोडून जात. मला हे अस वाटण्यामागे आणखी एक कारण आहे. मागील वर्षी संप्टेंबर २०१३ मधे २०११ सालची लोकसंखेची एका वर्षातील वयानुरूप माहिती लोकसंख्या आयोगाने प्रकाशित केली आहे. २०११ हे भारताचे सर्वात तरुण वय, कारण १५-२४ वयोगटातील लोकसंख्या त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहचली आणि १५-६४ हा कार्यक्षम,क्रयशक्ती असलेले गट हा लोकसंखेच्या ६४% इतका होता. थोडक्यात २०११-२०१३ दरम्यान आपला देशाने त्याच्या ऐन तारुण्यात पदार्पण केले आणि पुढील ६ वर्षे तरुण राहील, म्हणजे २०२० साली सरासरी वय २९ असेल. या संदर्भाने विचार केल्यास दरवर्षी जगभरातील एखादा देश हा तरुण होत असेल आणि एखादाच्ये वय वाढत असेल, हो ना? 

मग, आपण येणारा काळ किंवा वर्षे  तरुण आहेत असे काही प्रमाणात म्हणू शकतो कि नाही?  कदाचित थोडा कल्पनाविस्तार असेल पण काय हरकत आहे असा विचार करायला. पोट्लीवला बाबा सगळीकडे फिरून लहान मुलांना छान छान गोष्टी सांगत नव-नवीन गोष्टी जमा करत तरुण होत जातो आणि लहान तान्हा होतो, तशीच हि पुढे येणारे वर्षे असू देत. 

लोकसंख्येबद्दलची माहिती खालील काही दुव्यावर उपलब्ध आहे आणि या अनुसंगाने येणारे आर्थिक धोरणे आणि सध्याची परिस्तिथी याबद्दल पुढील एखाद्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहीन.  

दुवे- http://www.censusindia.gov.in/2011census/population_enumeration.aspx
http://catalyst.nationalinterest.in/2013/09/09/the-age-of-india/
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6911544.stm

नवीन वर्ष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. 

Friday, 20 December 2013

गोंधळ बातम्या, गोंधळ चर्चा आणि आपली फसवणूक 


दूरदर्शनवरील बातमीपत्र आठवतात का रे तुला ? रोज सायंकाळी ७ वाजता असतात पण सध्या प्रदीप भिडेंचा भारदस्त आवाज नसतो. तो आवाज फक्त भारदस्त होता असे नव्हे त्याबरोबर एक संथ लयीवर सर्व बातम्या, दिवसभराच्या घडामोडी सांगितल्या जायच्या. कधीही , कुठेही घाई - गडबड आणि मुख्य म्हणजे आरडओरडा नाही. अजूनही दूरदर्शनवरील बातमीपत्र तशीच आहेत आणि मला अआवर्जून आवडतात बघयला. 

खाजगी वाहिन्या तांत्रिक दृष्ट्या प्रगत असतील पण त्यांना दूरदर्शनसारखी थोडक्यात, महत्वाचे आणि मोजक्या शब्दात सांगण्याची कला आणि कसब नाही अस वाटत. कदाचित, २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या असल्यामुळे तेथे बातमीपत्र "लांबलचक" आणि "दिलखेचक" अदाकारीने सांगितली जातात. बातमीपत्र सांगणारा/री यांचा पोशाख  पण कमालीचा बदलला आहे आणि ते सुटाबुटात दिसतात, महिला निवेदक सुद्धा!!. दूरदर्शनवरील निवेदक मात्र पारपंरिक आणि नाविन्य दोन्हींचा वापर करताना दिसतात. दीपावली, दसरा यासारख्या सणादिवशी हमखास पारपंरिक पोशाख त्यातही दूरदर्शनचे मात्र एवढे भारीतील नसतात पण खाजगी वाहिन्यावरील ( IBN -लोकमत, ABP -माझा ) निवेदक एकदम चमचमत असतात. 

हे सर्व वरवर दिसणारे फरक आहेत. मला ज्याकडे लक्ष वेधायचे आहे ते म्हणजे, खाजगी वाहिन्यावर असणारी चर्च्यासत्राकडे , ४-५ वेगवेगळ्या क्षेत्रातील ( त्याच्यादृष्टीने बुद्धिमान, विद्वान  हा !!)  लोकांना घेऊन जो गोंधळ घातला जातो त्यामुळे बातमी बघण्यातील सगळा रस निघून जातोय. चर्चासत्र चालू होते ते मुळात एखाद्या ब्रेंकिंग न्यूजने आणि त्यावर सगळी मंडळी, निवेदाकाबरोबर तो विचारील त्या प्रश्नाला उत्तर न देता आणि वेगळाच काहीतर मुद्दा सांगत /मांडत नाहक वादविवाद ( हीच का ती चर्चा ) करताना दिसतात. निवेदकपण काही कमी नाहीत. तो/ती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो/ते  सगळ्यांना आणि प्रत्येकाची मते ( भाग घेणारी मंडळी स्वताचे  मत रेटत राहतात ) मागतो. राजकीय चर्चा असल्यास तर अजून फोडणी आणि भडका असतो. नेतेमंडळी आपला पक्ष कसा बरोबर ( घड्याळातील वेळ!!) आहे आणि तो किती निर्मळ ( कमळ नव्हे !!), स्वच्छ  ( हात असतात ) आहे हे अगदी पान खाऊन आणि तोंड रंगवून ( स्वताचेच)  बडबड करतात. 

या अश्या चर्चांमुळे आपण  मात्र एखाद्या घटनेचे गांभीर्य हरवून बसतो आणि मुख्य मुद्दा बाजूला जाऊन भलतीकडेच चर्चा संपते आणि लोक त्या बातमीकडे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पाहतपण नाहीत. हि एक प्रकारे आपली फसवणूक आहे ती नाही… हो फसवणूक कि हसवणूक!! कारण बातम्या, चर्चासत्र म्हणजे आता करमणूक झाली आहेत. पूर्वी अश्या कार्यक्रमातील लोक त्या घटनेतून बोध घेऊन शोधून शोधून एक तर त्याबद्दल लिहित किंवा त्याच्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत. आताही काही अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर सगळा उजेडच ??? ( उजेड कसा म्हणायचं  बर ) सगळा अंधारच आहे. ह्यातसुधा ती वाहिनी कोणाच्या मालकीची आहे त्यावर बातमीचा ढंग, निवेदन आणि त्याची तीव्रता ठरते. 

दीपक चौरासिया म्हणायचा "चैनसे सोना है, तो जाग जाओ" तसे आता म्हणायची वेळ आली आहे " छान बातम्या ऐकायःचा आहेत तर "दूरदर्शन " पहा"… फसवणूक करून घेऊ नका… 

Thursday, 19 December 2013

काय भावा, काय म्हणतोस !!!

किती वेळा विचार केला कि आपण पण ब्लॉग लिहावा आणि मनात येणाऱ्या विचारांचा जो खळखळ लोंढा आहे तो व्यवस्थितपणे पाटाच्या पाण्यागत मनाच्या शेतात फिरवावा. आता मुहूर्त झाला आहे आणि मनाचा संवाद चालू होऊन, आता  त्याच्याशी गप्पा मारणे आणि त्याचा शब्दरूप प्रवाह येते रिता करणे, म्हणजेच कोल्हापुरी शब्दात मी माझ्या मनाला रोज ( जमलं  तर !!) काय भावा, काय म्हणतोस  !!! म्हणणार आहे...