Friday 14 February 2014

Valentine Special


माझ्या अर्धांगीनिसाठी काही शब्द 

The feeling felt at its best,
Holding Hands and Glance, 
Breathing together, Knowing each other,


Without saying a single word,
Walking through mountain adversaries with smile,
For each others smile..
Be My Valentine oh my Love Madhuri for all the journey of immortal time..

Tuesday 11 February 2014

भारतीयत्वाची तहान, सामाजिक नाकार्लेपण आणि संधी

सत्या नाडेला  यांची मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी -CEO पदावर नियुक्ती झाली आणि भारतीय म्हणून थोड का होईना, आपल्या अंगावर मांस वाढले. आपल्या देशातील एक व्यक्ती शिकून, मेहनतीने उच्च पदावर पोहचल्याचा आनंद साजरा करावा कि नको? पण तो केलाच तर त्यातून काय बोध घ्यावा याबद्दल अतिशय तिखट शब्दात, योग्य अशा कारणासहित विवेचन लोकसत्ता संपादक श्री. गिरीश कुबेरांनी या लेखाद्वारे ( बेगने शादी मे ) केले आहे. श्री. कुबरांनी आपल्या या वृत्तीची अक्षरशा वाभाडे काढलेत आणि हा लेख वाचल्यानंतर माझी अश्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे हे खरे. हा लेख वाचल्यानंतर मी आपल्या या बांडगुळी भारतीयत्वाच्या तहानेकडे थोड्याश्या निराशेनच पाहत होतो.  मग दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या M.B.A. च्या प्राध्यापकांनी खूप छान आणि अगदी वेगळी प्रतिक्रिया फेसबुकवर नोंदवली आणि त्यामुळेच हि ब्लॉगपोस्ट तयार झाली.

बरेच भारतीय, जे सध्या "जागतिक भारतीय" म्हणून  सन्मानाने मिरवतात ते खरच आपल्या या "भारतीयत्वाचा" अभिमान बाळगतात कि नाही, जर तसा अभिमान असेल तर का आपण तो साजरा करू नये. उदाहरण द्यावयाचे झाल्यास प्रणव मिस्त्री  चे आपण देवू शकतो. त्याने स्पष्टपणे कबुल केले आहे, आजवर जे काही संशोधन त्याने केले आहे त्याची  प्रेरणा, स्फूर्ती त्याला आपल्या देशांतील सामाजिक समस्यांमधून आणि भारतीय पौराणिक गोष्टीतून मिळाली आहे. याशिवाय डॉ. शिव आय्यादुराई यांचेही उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यांनी ई -मेल क्रांती आणली, त्यांचे द ई -मेल रेवोलुशन खूपच प्रसिद्ध असे पुस्तक आहे आणि जे सध्या भारतीय प्राचीन सिद्ध -आर्युवेदिक औषधोपचार आणि आधुनिक आरोग्यशात्र यांची सांगड घालण्याचा प्रयत्न, संशोधन करत आहेत.   

ज्यांनी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध केल आहे असे भरपूर भारतीय आहेत, त्याचबरोबर भारतीयत्वाची ओळख पदोपदी, त्याच भांडवल न करता, जतन केली आहे अशा लोकांचे यश का म्हणून साजरे करू नये. याशिवाय जे लोक आपल्या लोकांच्या सन्मानाने हुरळून न जाता, आपल्या शैक्षणिक, समाजिक आणि राजकीय व्यवस्थेमधील पोकळपणा दाखवत असतील तर त्याने दुखी न होता त्यांवर सुधारणा शोधण्यात सुख मानावे. सध्याच्या घडीला यशस्वी "जागतिक भारतीय" यादी मोठी होत आहे आणि त्याबरोबर आपल्या इथिल शिक्षण संस्थामधून बाहेर पडून, आंतराष्ट्रीय कंपनीचे कार्यकारी अधिकारी, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रामध्ये जाऊन शास्त्रज्ञ/संशोधन करणारे वा तश्या संधी नाकारणारे काही कमी नाहीत. या आनंद उत्सवाला एक संधी का बर मानू नये?

गिरीश कुबेरावतीरिक्त मजेशीर, आपल्याला कोपरखळी मारत पण गंभीरपाणाचे पदर सुटू न देत,छोटीशी खास कोल्हापुरी भाषेच्या मुशीतून आलेली प्रतिक्रिया ही खाली दिलेली आहे. मूळ लेखक हे माझे M.B.A. सवांद कौशल्य आणि व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण सुधारणा विकास या विषयाचे प्राध्यापक श्री. राजेंद्र पारिजात ( ज्यांना मी खूप घाबरायचो, त्यांनी पहिल्याच दिवशी, पहिल्याच लेक्चर मध्ये पाय किती पाण्यात आहेत आणि  त्यामुळे किती हातपाय मारावे लागनार  आहेत हे सांगितले ) यांची आहे. 

सत्या तुझ्यासाठी कायपण!!



आयला सत्या तू एवढा मोठा व्हशील अस वाटल न्हवत गा!
शेवटी 'बिलू'बाला कल्ल कि तुम्च्याकडून घेण्यासारखं लई काय है म्हणून 
मागण लई नाही पण ते क्लोउड का काय त्यावर् न आमच्या गावच रस्ते करता येतील का त्ये बघ बाबा.… 
आणि सगळ्या हुशार पोरी बाली हु म्हणून फिरत्या त गा
पर कायदा करून बी 
वाकडी नजर न्हाय बदलली तुझ्या देशातल्या पबिलक ची ...
भावा अस काय तरी जमीव कि मनात कै झाल न्हव कि तुझ्या सरवर ला सायरन वाजला पाहिजे बघ .
सगळी गल्ली जागी होवून शान बुक्का झाला पायजे अल्स्यानचा 
त्यो केज्रीवालंचा अरव्या झाडू घेवून लागलाय मागे 
पन त्येला काय निभत नाही ते ... 
ते मफलर घेवून रसत्यावर झोपत्याल आणि परत ऑफिसला जात्याल
त्याला एक एम एस ओफ्फिस शिकीव म्हणजे झाले ..
आणि तरणी तरणी पोर पोरी घेतासा तुम्ही पण 
ती आय बापाला सोडून जात्याल न्हव का ?
तवा इथच गावा कड काय जमवता येतय का बघ कि गा !..
अजून आमच्या पाण्यात विष कालवून पित्याल रे ते 
जनावर आणि मान्स सगळी फुकापासरी मर्त्याल्च रे 
त्ये तुझा क्लोउद ला गिरीन हौसे च काय कसे व्हत नाही गा !
अशी फुकट मर्नार्यांचे काय तरी बग बाबा ...
तुला काय प्रत्यक्ष भेटू नाही जमल प्र फोटू बघितला , 
जीवाल काय तरी खा .. उगाच वणवण करू नग 
त्यो बिल्या हिकड भारतात फिर्तुया शेताव् र ण 
चैन्या करत .. तू तिकड एवढा घोर लावून घेवू नग ..
प्र काय बी म्हण 
सत्या 
एकदा 
नाद खुळा काम दावच सगल्यास्नी ...
तवा मग अहि पण म्हणू 
सत्या तुझ्यासाठी काय पन..
होवूंदे खर्च 
आमचा सत्या हाये गच्च ..."