Friday 3 February 2017

आम्ही सांगू तीच पुर्व

कालच व्हाट्सअप वर एक संदेश वाचला ज्यामध्ये आजकालची तरुण मंडळीना कशी वैचारिक झोप लागलीय, त्यांचं बौद्धिक कुपोषण झालाय याचा बराच उहापोह केला गेलाय. नाही, विषय एकदम बरोबरच आहे. ज्या लोकांना इतक्या दिवसाचे फुकट खाऊन खाऊन अजीर्ण झाल्यानंतर त्यातून भ्रष्टचाररुपी तुंबलेल्या गटारची दुर्गंधी सुटली आणि नेहरू-गांधी यांचं कसल्याही परिस्तिथितीत गुणगान गाण्याची जी सवय (हागवणूक) लागली, त्यांची हि सगळी थेरं  डोहाळे लावून सामान्य लोकांनीच उस्फूर्तपणे उजेडात आणली. यामुळे खरा राग आलाय या तथाकथिक पुरोगामी लोकांना.

या पुरोगाम्यांनी विद्यापीठ, वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्या (?? कोंबड्याच्या झुंजी लावण्याऱ्या) ह्या सगळ्यां ठिकाणी त्यांची मक्तेदारी त्यांनी गेल्या ५५-६० वर्ष्याच्या काँग्रेसी सत्ताकाळात उभी केली आणि त्याद्वारे त्यांच्या विरोधी किंवा सहमत नसलेली विचारधारा दाबून ठेवली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, विद्यापीठात कोणा विध्यार्थाचा संशोधन निबंध मंजूर केला नाही तर कधी त्यांच्याशी सहमत नसणाऱ्यांना वृत्तपत्रे -वृत्तवाहिन्या व्यासपीठावर आवाज दिला नाही. वा  रे, पुरोगामी आणि हीच का तुमची व्यक्तिस्वातंत्राची परिभाषा. स्वतः म्हणू तीच पूर्व अशी हि वृत्ती आहे. आम्ही सांगू तेच नेते चांगले, आम्ही ठरवू तीच भारताची सांस्कृतिक ओळख, आम्ही लिहू तोच भारतीय मामूजान इतिहास आणि आम्ही सांगू तीच भारतीय सहीष्णूता.

या सर्व गोष्टीबद्दल उहापोह करून, त्याला पुरावे सादर करून खरी कि खोटी ती कितपत योग्य हे तपासायला नको कि तुम्हाला पोसण्याऱ्या काँग्रेसी सत्ताधीशांच्या सोयीची असणारी सगळीकडची वैचारिक मक्तेदारी आता उध्वस्त होतं आहे, हे खरं दुखणं सांगताही येत नाही.

समाज माध्यमेद्वारे ( ट्विटर, फेसबुक आणि व्हाटसप ) फिरणारी माहिती खरीच असते असं नाही पण ती पूर्णपणे खोटी असते किंवा त्यात बिलकुल तथ्य नसते असा एक समाज पसरवण्याचा हेतू आहे या लेखामागचा. समाज माध्यमेच्या द्वारे इंटरनेट वरील विकिपीडिया, परदेशातील विद्यपीठातील तिथे अध्यानाद्वारे जी तथ्य स्थापित झाली आणि त्यांच्या संदर्भाने भारतात पूर्वी लिहून ठेवलेली इतिहासात म्हणा किंवा समाजशाश्त्रातील जी काही डावी लेखणीद्वारे गृहीतक होती त्यांना आता आव्हान निर्माण होत चाल्लीयेत. मग करा आता दुष्प्रचार या समाज माध्यमांच्या विरोधात.

जरा निरीक्षण करा, गेल्या वर्षभरात काँग्रेसी आणि त्यांच्या डाव्या, फसव्या पुरोगामी लोकांनी ट्विटर, फेसबुक आणि व्हाटसप द्वारे ज्या लोकांनी त्यांना नागडं केलाय त्या सर्वाना आणि या व्यासपीठालाच खोटं माहिती देतात, लोकांना , तरुणांना चिथावणी देतात असल्या आरोपाद्वारे त्यांचा आवाज दाबण्याचा पद्धतशीरपणे एक कलमी कार्यक्रमचं चालू केलाय. जरा कोणी गांधी -नेहरूच्या चुकीच्या धोरणाची टीका केली किंवा सावरकरांची चांगली बाजू मांडली कि म्हणा त्याला "मोदी -भक्त" आणि कर त्याचा तोंड बंद. अशी हि यांची पुरोगामी वैचारिक उहापोहाची पद्धत. गांधी -नेहरू, डॉ आंबेडकर याची प्रतिमा एवढी  आवाजावजी मोठी केलीय आणि त्यांना देवाचं बनवून ठेवलय. जशी आता मोदींच्या प्रत्येक निर्णयाची चांगली - खराब अशी दोन्ही बाजूने वैचारिक चर्चा होते म्हणा, यात टिंगल टवाळीच जास्त आहे, तशी चर्चा का बुवा होऊ नये या नेत्यांच्या बाबतीत.

या लेखाचा दुसरा हेतू म्हणजे सामान्य लोकांना त्यांची स्वतःची अशी वैचारिक क्षमता  नाही आणि म्हणून या समाज माध्यमाद्वारे तयार झालेल्या तथाकथिक आभासी वास्तवावर विश्वास ठेवू नये अशा शहाणपणा हा लेख झोडतो. का बुवा, तुमच्या डाव्या वैचारिक  बैठकीचा धुव्वा उडवला जातोय म्हणून ते लगेच आभासी वास्तव आणि तुम्ही सांगाल तेच वास्तव का बरे मानावे. असं करताना मग या सामान्य लोकांची काय डुलकी लागत नाही काय कि तुमचे विचार हे एकदम प्रथिनयुक्त असून वैचारिक पोषण करणारे (कि हगवण लावणारे !!) आहेत.

थोडक्यात काय तर, दुसऱ्याचं ते कार्ट आणि माझा तो (राहुल)बाबा आणि आम्ही सांगू तीच (नेहरू-गांधी) पूर्व दिशा. आमच्याशी जो सहमत नाही ते सगळे "मोदी-भक्त" किवा  जल्पक (लोकसत्ताचे हुशार संपादक कुबेराचा हा शब्द आहे ट्विटर ट्रोल साठी).

ता.क . स्वतःची बुद्धी वापरून तुमच्या वाचनाची सवय जर चांगली झाली, देशो देशीचे संशोधनाचे ज्ञान समाज माध्यमावर तुमच्या दारात आले तर आम्ही आमची दुकान चालवयची कशी? हा प्रश्न विचारलं तर बघा हा, मोदी भक्त कुठले ;)