सामान्य जनतेच्या IQ'वर विश्वास ठेवा
२०१५ सालात चर्चवरील हाल्यांपासून (त्यांचा पुढे निष्कर्ष काय झाला कोणाला माहित नाही, आहे माहित कोणाला?) ते आता मागील आठवड्यातील दादरी घटनेपर्यंत अनेक वृत्यापात्रातून अग्रलेख, वितारवंताचे लेख, वाचकांचे बरेच पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. सर्व लेखामध्ये भारताची घटनादत्त प्राचीन अशी धर्मनिरपेक्षीता, सर्वधर्मसमभाव जी भारताची ओळख आहे ती फक्त तथाकथित पुरोगामी राजकीय पक्षांनी टिकवून ठेवली आहे, ती म्हणे धोक्यात आली आहे असा एक सूर उमटतो आहे. जणू काही, आता ती लगेच काळाच्या पडद्याआडच जाणार. आपल्या देशाचा, जनतेच्या निर्णयाचा इतिहास बघितल्यास असे काही होईल असं मुळीच वाटत नाही; कारण जी धर्मनिरपेक्षीता १९६९ च्या गुजरात, १९८४ च्या शिख, १९८९ च्या भागलपूर दंगलीमुळे आणि १९९२-९३ च्या बॅाम्बस्फोटानंतर झालेल्या दंग्यामुळे आणि या सर्व आणि या व्यतिरिक्त इतर काही घटनानंतरही टिकून आहे ती सध्याच्या काही घटनांमुळे कशी नष्ट होईल. पण, अशी आरोळी/आवाई सारखी सारखी ऊठवून ती नष्ट करण्याचे प्रयन्त मात्र नक्कीच होणार. भारतीय समाज मूळातच सहिष्णू आहे, लोकांना थोडं उशीरा का होईना पण शहाणपण आलेलं आहे.
या सर्व ठेचा (मिरचीचा) खाऊन लोक बरेच समजूतदार झालेत, त्यात Whatsapp/फेसबुक/ट्विटर सारखे माध्यमांचा 'विधायक' उपयोग लोकांच्या लक्ष्यात आला आहे. त्यामुळे पुर्वीसारख कोणीही उपटसुंभ यावा, लोकांना चिथावणी देऊन अघटीत घडवून आणावं असा होणार नाही आणि आम्ही समजूतदार लोकं हे होवू देणार नाही.
माध्यमांनी त्याच काम मात्र चोख, प्रामाणीकपणे कराव. सत्ताधारी चुकत असतील तर त्यांना टिकेने झोडपून काढा, पण जर ते चांगल काम करत असतील तर त्यांच कौतूक राहू दे, पण चांगल्या धोरणाबद्दल' प्रोत्साहन' तर द्या. भडक विधानांची भलावण माध्यमांनी टाळली पाहिजेत, कारण सध्या वृतपत्र/वृत्तवाहिन्या यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. याचं मूळ कारण म्हणजे, वृतपत्र/वृत्तवाहिन्या यांच्या मालकांचे राजकीय लागेबांधे सगळे whatsapp/फेसबुक/ट्विटर च्या कट्ट्यावर उघड झाले आहेत, त्यामुळे लोकांना समजलंय कि यांना किती गंभीरपणे घ्यावं. तेंव्हा, माध्यमांनी आणि प्रस्थापित बुद्धिवाद्यांनी कितीही गळे काढले तरी सामान्य माणसांची मती ते भुलवू शकणार नाहीत आणि असेच जर ते करत राहिले तर सामान्य जनता याच्याकडे साफ दुर्लक्ष करेल. मला एवढेच म्हणायचे आहे, सामान्य जनतेच्या बुद्धीमत्तेला कमी लेखू नका, कारण यांनीच २०१४ मध्ये भ्रष्टाचाराची गटारी स्वच्छ केली आहे आणि तश्याच पद्धतीने ते जर वेळ आली तर तथाकथित धर्मवादी सरकार उलथवून टाकतील. (हिंदुत्ववादी नव्हे, कारण धर्मनिरपेक्षीतावदी हेदेखील छुपे धर्मवादीच आहेत).